विचारांची जयंती करू
हा लेख प्रत्येक भीमसैनिकांसाठी आहे जे या वर्षीची भीम जयंती साजरी करण्यासाठी आतुर आहे . हा लेख आपल्या भावना समजून त्या वर भाष्य करणारा आहे . हा लेखामधे समजण्यासारख व समजून घेण्यासारख भरपूर काही आहे . अशा करतो की हा ही लेख तुम्हाला नक्की आवडेन .
भीम जयंती येण्या आगोधरच त्या वर चर्चा चालू असते की , आता या वर्षीची भीम जयंती किती जलोषात साजरी कराची ते . भीम जयंती नुसती भारतात न करता अमेरिका , जपान , ऑस्ट्रेलिया , लंडन इत्यादी शहरात साजरी करतात . बाबासाहेबांची जयंती ही नुसती जयंती नसून भीमसैनिकांसाठी एक सण आहे . हाच सण या वर्षी अडचणीत आला आहे त्याच कारण तर सर्व जनतेस माहित तर असेनच . कोरोना ( COVID 19 ) हा विषाणू आपल्या भारतात आला आहे त्या वर उपाय आजून ही निघाला नसून प्रत्येक भारतीयांना आव्हान केल जात आहे की घरा बाहेर पडू नका , जर गरज असेल तर मास्क लावून बाहेर पडा व लोकांशी जास्त भेटू नका , बाहेरून आला की साबणाने किंवा सानिटाइजर ने हात धूवा . सरकार एकजूठीने काम करीत आहे आणि आपण एक भारताचा जवाबदार नागरिक म्हणून या कामात आपण आपले योगदान दिल पाहिजे आणि याचे परीणाम आपल्यासाठी जेवढे उपयुक्त ठरेल ना तेवढेच ते आपल्या देशासाठी ही ठरेल .
भारताच्या पंतप्रधानांनी २२ मार्च २०२० या दिवशी रात्री ८ वाजता हे सांगीतल होतेे की भारतात हा जीव घेना विषाणू ला संपवण्यासाठी आपल्याला २१ दिवसाचा लॉकडोव्न पाळावा लागेन . पंतप्रधानाच्या या निर्णयावर माझा काहीही आक्षेप नाही त्यांनी हा निर्णय प्रत्येक भारतीयांच्या भल्यासाठी घेतलेला आहे . तरी सुद्धा लोक या निर्णयाला पुरेपूर प्रतिसाद नाही देत , म्हणून भारतात कोरोना सारख्या विषाणूने पसरण्यात वेग घेतला आहे तर या विषाणू वर मात करण्यासाठी आपण सर्वे घरातच बसू व सरकारच्या नियमांचे पालन करू . या वर्षी भीम जयंती होणार नाही आसे नाही , भीम जयंती होणार प्रत्येकाच्या घरी होणार , पण शांततेत होणार नाही कोणत्या धूमधड्याकात . यावेळी पहिल्यांदा भीम जयंतीत सगळ सून असेन पण काही हरकत नाही , कारण देशाची सुरक्षितता पण महत्त्वाची आहे आणि असा कलम सुद्धा साहेबांचाच आहे बाबासाहेब आमच्या मना मना मध्ये आहे त्यांची जयंती जरी या वर्षी जोरदार किवा जल्लोशात होऊ शकली नाही तरी याच दुख मनात खन्त करत राहिलच पण काय हरकत नाही . आम्ही बाबासाहेबांची विचारची जयंती करू , या वेळी नाचून नाही तर बाबासाहेबांना वाचून मानवंदना देऊ . प्रत्येक भीमसैनिकांना माझ्याकडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही १४ एप्रिलला घरा बाहेर न पडता घरातच डॉ . बाबासाहेबांना मानवंदना द्या व आपली स्व्ताची काळजी घ्या .
बाबासाहेबांचे विचार आपण आहमलात आणू व बाबासाहेबांचे विचार जग भर पसरवू . बाबासाहेबांची जयंती या वर्षी विचारांची करू व विचारा विचारात बाबासाहेबांना मानवंदना देऊ .
माझ्या प्रत्येक देशवासीयांना व भीमसैनिकांना येवढच सांगण आहे की हे जे संकट आज आपल्या देशावर आल आहे त्या वर आपण मात करू व पुढचे आदेश येई पर्यंत घरातच राहून आपण आपले सौरक्षण करु . आपल्या भारतासाठी भीम जयंती या वर्षी जरी नाही झाली किंवा घरातच या महापुरुषाला मानवदना दिली तरी काही हरकत नाही , जर तुम्ही खरो खर भीमसैनिक किंवा भीम अनुयायी असाल तर या वर्षी जरी भीम जयंती नाही झाली तरी काय फरक पडला नाही पाहीजे कारण डॉ . बाबासाहेबांचेच वाक्य आहे की
” आपण प्रथम ता भारतीय व अंतथा ही भारतीय ” हे जर का वाक्य सर्व भारतीयांनी व भीमसैनिकांनी लक्षात घेतले पाहीजे . भीम जयंती जरी भीमसैनिकांना करायची असेन तर बाबासाहेबांच्या विचारांची करा कारण या वर्षी ची बाबासाहेबांची जयंती प्रत्येक भारतीयांना लक्षात राहील व खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना एक नवीन आंबेडकर अनुयायी व भीमसैनिक बघायला भेटेल .
🙏 जय भीम 🙏
- लेखन
खुद्दरंग